Anna Hazare| महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. राज्यातील 11 मतदार संघामध्ये आज मतदान होत आहे. यात अहमदनगर मतदार संघाचा देखील समावेश आहे. येथून सुजय विखे पाटील आणि नीलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. नुकतेच समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी आण्णा हजारे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन करत कोणाला मतदान केले पाहिजे, याबाबत सांगितले आहे.
काय म्हणाले आण्णा हजारे ? Anna Hazare|
“मतदानाचा हक्क बजवल्यानंतर अण्णा हजारेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, “आज लोकशाहीचा मोठा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. तसेच मतदान करताना चारित्र्यशील आणि निष्कलंक माणसाला मतदान करावे. मतदारांच्या हातात देशाची चावी असल्यामुळे ही चावी योग्य पद्धतीने योग्य कुलपाला लावून योग्य उमेदवार निवडावा. पैसे घेऊन मतदान करणे हे देशाचं दुर्दैव असल्याचे सांगत हा शहीद झालेल्या शहिदांचा अपमान आहे. म्हणूनच निष्कलंक उमेदवारांना निवडून द्या. ईडीसारखे गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारांना निवडून द्या,” असेही ते यावेळी म्हणाले.
“ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. तो मतदारसंघासाठी किती झिजला, दिव्यासारखा किती जळला हे पाहणे गरजेचे आहे. ते पाहूनच मतदान करा. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे. मतदान केले पाहिजे. मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. मतदारांच्या हातात देशाची चावी असल्यामुळे ही चावी योग्य कुलपाला लावून योग्य उमेदवार निवडा,” असे आवाहन आण्णा हजारे यांनी नागरिकांना केले. Anna Hazare|
हेही वाचा: