लखनौ : राज्यात कलम १४४ लागू असतानाही, लखनौच्या अनेक भागात हिंसाचार झाला आहे. हिंसक जमावाने दोन पोलिस चौक्यांना पेटवले आहे. तर अनेक भागात तोडफोड दगडफेक सुरू आहे.
लखनौच्या दालीगंज, हजरतगंज भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला असून अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. यादरम्यान, हल्लेखोरांनी मीडियाच्या ओबी व्हॅनलाही आग लावली.