Vijay Deverakonda Filmfare Award| दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याचा चाहतावर्गही तसा बराच मोठा आहे. विजयनं त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. याशिवाय त्याला अनेदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. काही वर्षांपूर्वी त्यानं त्याचा पहिला फिल्मफेयर अवॉर्डचा लिलाव केला होता. यावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यानंतर आता त्याने पुरस्काराचा लिलाव करण्यामागचे कारण सांगितले आहे.
विजय देवरकोंडानं 2016 मध्ये ‘पेली चूपुलु’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर विजयला दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाच्या ‘अर्जुन रेड्डी’ मध्ये केलेल्या त्याच्या अभिनयासाठी पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटासाठी मिळालेला हा पुरस्कार विजयनं 25 लाखांना विकला होता. मात्र त्याने असे का केले? याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
काय म्हणाला विजय देवरकोंडा?
विजयनं सांगितले की , “फिल्मफेअरने दिलेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मी लिलाव केला. यातून जवळपास 25 लाख रुपये मिळाले होते. ही माझ्यासाठी असलेली आजवरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी या अवॉर्डमधून मिळालेले 25 लाख रुपयांची रक्कम ही मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी देणगी दिली.”
याच मुलाखती दरम्यान विजयला त्याच्या घरात अवॉर्ड्स ठेवण्यासाठी एक ठरावीक जागा किंवा शेल्फ आहे का? असे विचारण्यात आले. यावर विजयनं सांगितलं की “काही अवॉर्ड्स हे माझ्या ऑफिसमध्ये आहेत, काही माझ्या आईनं घरी ठेवले आहेत. यातील काही पुरस्कार मी देऊन टाकतो, त्यापैकी एक मी संदीप रेड्डी वांगाला दिली आहे.”
पुढे तो म्हणाला, “आम्ही फिल्मफेअरकडून मिळालेल्या माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा लिलाव केला. त्यातून देणगीचा काही मोठा भाग मिळाला. ही माझ्यासाठी माझ्या घरी असलेल्या एका दगडाच्या तुकड्यापेक्षा चांगली आठवण आहे.”
विजयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर झळकणार आहे.
हेही वाचा:
” प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ…” ; सरन्यायाधीशांचा केंद्रीय तपास यंत्रणांना महत्वाचा सल्ला