Prashant Kishor । निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) हे त्यांच्या कामाबद्दल खूप उत्साही आहेत. या कारणामुळे ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, यामुळे कुटुंबीय त्याच्याबद्दल वारंवार तक्रारी करतात. कधी-कधी या प्रकरणावरून त्यांचे घरच्यांशी भांडणही होते.
प्रशांत किशोर यांचे वडील दिवंगत श्रीकांत पांडे, बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोनार गावचे रहिवासी हे डॉक्टर होते. पीकेच्या मते, त्यांचे वडील काँग्रेसचे नेता होते. तर त्याची आई, दिवंगत सुशीला पांडे, गृहिणी होत्या आणि तिच्या मुलाच्या ‘ब्लाइंड सपोर्टर’ होत्या. पीके जे काही बोलले किंवा केले, ते नेहमीच बरोबर असल्याचे त्यांनी मानले. मात्र, त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या राजकारणाच्या विरोधात होत्या.
एक भाऊ दोन बहिणी Prashant Kishor ।
पीकेच्या कुटुंबात त्यांचा मोठा भाऊ अजय किशोर हे देखील आहेत. ते पूर्वी पाटण्यात व्यवसाय करत असे. नंतर ते दिल्लीत आले आणि सध्या ते उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहतात. पीकेला दोन बहिणीही आहेत, त्यापैकी एक दिल्लीत राहते आणि तिचा नवरा आर्मी ऑफिसर आहे.
प्रशांत किशोर यांच्या पत्नीचे नाव जानवी दास असून त्या मूळच्या आसाममधील गुवाहाटी येथील आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. दोघांना एक मुलगा असून तो सध्या आठव्या वर्गात शिकतो. पत्नी स्वत:ला ‘स्मार्ट वर्कर’ समजते, तर पीकेकडे त्या ”हार्ड वर्कर’ म्हणून पाहते.
कधीही वाढदिवस साजरा न करणाऱ्या पीकेने प्रेमविवाह केला होता. 20 वर्षांपासून त्यांनी कोणताही चित्रपट पाहिला नसला तरी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते अभिनेते आहेत. विशेष म्हणजे पीकेने सध्या 12 ते 13 हजार रुपये किमतीचे शूज घातले आहेत. हा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता आणि सांगितले होते की, पदयात्रेदरम्यान खूप चालावे लागते. अशा स्थितीत त्यांचे जोडे चार महिनेच टिकतात.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही दावा केला की त्यांना जन सूरजकडून निधी/देणग्या केवळ चेकद्वारे मिळतात. त्यांना आयुष्यात जास्त पैसा नको असतो, उलट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
बिहारमध्ये काम करूनही राज्याचा विकास नाहीच Prashant Kishor ।
मुलाखतीदरम्यान पीकेने हे देखील सांगितले की, ते 2015 मध्ये बिहारमध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये खूप सक्रिय होते. त्यांना कोणतेही पद मिळवायचे असते, तर ते त्यांनी तेव्हाच मिळवले असते. तेव्हा त्यांना रोखणारे कोणी नव्हते. मात्र, त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संस्थापक लालू यादव आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत केलेले काम बिहारला बदलू शकले नाही. यावर त्यांचा आजही विश्वास आहे.