नवी दिल्ली – उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मात्र येथील एका भुयारात अडकलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
चमोली जिल्ह्यात प्रचंड हिमस्खलन झालंय. यामध्ये अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आयटीबीपीच्या टीमला तपोवनच्या जवळच्या एका भुयारातून 16 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.
आयटीबीपीनं दिलेल्या माहितीनुसार 250 जवानांच्या तीन टीम बचावकार्यात गुंतलेल्या आहेत.
#WATCH | Uttarakhand: ITBP personnel rescue one person who was trapped in the tunnel near Tapovan dam in Chamoli.
Rescue operation underway.
(Video Source: ITBP) pic.twitter.com/RO91YhIdyo
— ANI (@ANI) February 7, 2021
भुयारातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आयटीबीपीच्या टीमने एकाला गाळातून बाहेर काढले आहे. मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत.