बेल्लारी – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बेल्लारी येथील सभेत “जय बजरंग बली’चा नारा देत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी, “कॉंग्रेसला माझ्या जय बजरंग बली म्हणण्यावरही आक्षेप आहे,’ असे म्हणत टिका केली.
एवढेच नाही तर मोदींनी या या रॅलीत “द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरही भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले, केरळ भारताचे एक सुंदर राज्य आहे. पण तिथे छुप्या पद्धतीने कसा दहशतवादी कट रचला जात होता हे संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधान मोदींनी बेल्लारीमध्ये 47 मिनिटे भाषण केले. त्यानंतर तुमकुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या रॅलीसाठी रवाना झाले. गत आठवडाभरातील मोदींचा हा तिसरा कर्नाटक दौरा आहे.
कॉंग्रेस पैशाच्या जोरावर खोट्या गोष्टी पसरवते…
#WATCH | ‘The Kerala Story’ film is based on a terror conspiracy. It shows the ugly truth of terrorism and exposes terrorists’ design. Congress is opposing the film made on terrorism and standing with terror tendencies. Congress has shielded terrorism for the vote bank: PM… pic.twitter.com/qlUQlc3qQf
— ANI (@ANI) May 5, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘कॉंग्रेस पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवते. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासने आहेत. ते टाळेबंदी व तुष्टीकरणाचे बंडल आहे. व्होटबॅंकेच्या भीतीमुळे आज कॉंग्रेसने दहशतवादाविरोधात चकार शब्द काढण्याची हिंमतही गमावली आहे’. असं ते म्हणाले.
सुदानमधील सद्यस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘सुदानमध्ये सध्या गृहयुद्धाची स्थिती आहे. कुठेतरी गोळीबार व्हायचा, तर कुठे बॉम्बस्फोट व्हायचे. घरातून बाहेर पडणेही अवघड झाले होते. आपले हजारो भारतीय बंधू-भगिनी सुदानमध्ये अडकले होते. यात कर्नाटकातीलही शेकडो जणांचा समावेश होता. पण सरकारने त्यांना त्यांच्या घरी सुखरूप परत आणले’.
यावेळी देशात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ नामक चित्रपटावरही पंतप्रधान बोलले. ते म्हणाले, “द केरळ स्टोरी’ची कथा केवळ एकाच राज्यातील दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे म्हटले जाते. देशाचे एवढे सुंदर राज्य, तेथील लोकही खूप कष्टाळू व प्रतिभावान आहेत. त्यानंतरही तिथे सुरू असलेले दहशतवादाचे कारस्थान या चित्रपटातून उजेडात आले आहे’. असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.