नवी दिल्ली : एका तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ बनवणाऱ्यांना बंगळुरू पोलिसांनी अखेर अटक केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध बंगळुरूतील राममूर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीवर सामूहित अत्याचाराचा आणि अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ आसाम पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओतील आरोपींची दृश्य सोशल मीडियावर शेअर करत, या घटनेबद्दल कुणालाही काही माहिती असल्याचे माहिती देण्याचे आवाहन केले होते.
These images are of 5 culprits who are seen brutally torturing & violating a young girl in a viral video.
The time or place of this incident is not clear.
Anyone with information regarding this crime or the criminals may please contact us. They will be rewarded handsomely. pic.twitter.com/ZnNjtK1jr6
— Assam Police (@assampolice) May 26, 2021
आसाम पोलिसांचे हे ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही रिट्विट केले . सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे रिजिजू म्हटले होते. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरूच होता. बंगळुरू पोलिसांना आरोपींबद्दलची माहिती मिळाली. पोलिसांनी व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींसह एका महिलेला अटक केली.
“व्हिडीओतील दृश्य आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध बलात्कार आणि हल्ला केल्याचा गुन्हा राममूर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आलं असून, तपासात पीडितेची मदत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे बंगळुरूचे पोली आयुक्त कमल पंत यांनी ट्विट करून सांगितले.
“हे सर्व एकाच ग्रुपमधील असून, ते बांगलादेशी आहेत. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताही बांगलादेशी आहे. तिला भारतात विक्रीसाठी आणण्यात आले होते. पैशांच्या वादावरून त्यांनी तिचा छळ केला आणि क्रूर अत्याचार केले. या प्रकरणाचा तपास केला जात आहे,” असेही पंत यांनी सांगितले.