किव्ह – रशियन फौजांनी सध्या युक्रेनमध्ये आपला हैदोस चांगलाच वाढवला आहे. कारण रशियाने आता युक्रेनच्या निर्वासित भागांवर ताबा मिळवण्यासाठी इथे तोफांचा मारा सुरु केला आहे. या हल्ल्यात तब्बल ३५० नागरिक ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर कार्किव्ह शहरावर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात काही डझन नागरिक मरण पावले, तर शेकडो जण जखमी झाले. याच हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
कार्किवमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली असून कार्किव गव्हर्नर हाऊस/सिटी हॉलवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो जेवण आणण्यासाठी गेला असताना हल्ला झाला. यात तो ठार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
भारतीय विद्यार्थी समन्वयक डॉ. पूजा यांनी खार्किवमधून सांगितलं की, 3000-4000 भारतीय अजूनही खार्किवमध्ये अडकले आहेत. आतापर्यंत 1922 विद्यार्थी युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतात परतले आहेत.