– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे भीमा नदीवरील चासकमान धरणातून २१ हजार ३५० क्यूसेस तर भामा नदीवरील भामा आसखेड धरणातून १८ हजार ५२७ क्यूसेस वेगाने पाणी सुरू असल्याने भीमा नदी अजूनही धोक्याच्या पातळीत वाहत आहे
भीमा नदीवरील चासकमान धरण क्षेत्रात ६३ मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत ८०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भामा नदीवरील भामा-आसखेड धरण परिक्षेत्रात आज ९२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १२६७ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तालुक्यातील अरळा नदीवरील कळमोडी धरणक्षेत्रात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १३८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.