नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधीचे 370 कलम रद्द केल्यानंतर सरकारवर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीदेखील सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच 370 कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरची खऱ्या अर्थाने नवी ओळख निर्माण झाली आहे. तसेच काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभं राहू शकेल असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
?? Historic day for India. 370 scrapped and Jammu & Kashmir now truly a part of India. The path to a safer, progressive and an open J&K determined by citizens, and not anti national separatists has been paved. ??
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2019
एनडीएसाठी आजचा दिवस आणि हा क्षण अभिमानास्पद आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसद आणि जनतेचे अभिनंदन करतो. यासाठी आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वात एनडीएला पाठिंबा दिला होता, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.