राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणार्या भीमा नदीवरील बंधार्यातील व नदी पात्रातील पाण्याची पातळीत घट झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी पाणी पातळी कमी कमी होत आहे. पाण्याअभावी शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे नागरिकांनी व शेतक-यांनी केली आहे. दरम्यान, चासकमान धरणातील पाण्याचे नियोजन कोलमडल्याने भीमा नदीचे पात्र कोरडे पडत आहे.
यावर्षी उन्हाचा पारा वाढला आहे. मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. भीमा नदी पात्रातील पाणी पातळीत घट होत आहे. भीमानीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे आटू लागले आहेत. काही बंधार्यांमध्ये 10 ते 12 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा राहिला आहे.
तोही शेतकरी शेतातील पिकांसाठी उपसा करीत आहेत. त्यामुळे आगामी 10 ते 12 दिवसांतच पाणीटंचाई निर्माण होणार आहे. शिवाय भीमानदीवरील अनेक बंधा-यांना गळती आहे त्यातूनही पाणी वाया जात आहे. भीमानदी पात्रात चास कमान धरणारतून पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे
हातातोडांशी आलेले पीक करपण्याची भीती
धरणाखालील भागात मोठ्या प्रमाणात बागायत केले जाते. रब्बी हंगामात धरणाखालील भागात शेतकर्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतली आहे. उन्हाळी बाजरी भूईमूग व इतर तरकारी पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. नदीपात्र कोरडे पडत चाललल्याने नदी जवळील विहिरी आणि शेतातील विहिरीं कोरड्या पडू लागल्या आहेत. पर्यायाने शेतकर्यांच्या शेतात हाताशी आलेली पिके करपण्याची भीती निर्माण झाल्याने शतकारी हवालदिल झाला आहे.
यंदा कडक उन्हाळा असल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे धरण प्रशासनाने भीमा नदीपात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होईल आणि पिकांना जीवदान मिळेल. – जयसिंग भोगाडे, संचालक, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती