नगर (प्रतिनिधी) – विकसित भारतात आपले अहिल्यानगर मागे न राहता त्याच वेगाने विकसीत व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिक व सर्व क्षेत्रातील तज्ञांच्या विकासाच्या नवनवीन संकल्पना व मत जाणून घेण्यासाठी विचार भारती या संस्थेच्या वतीने १४ एप्रिल पासून जन संवाद अभियान राबवले. गेल्या ६ दिवसात सुमारे २५ विविध क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधून त्यांच्या मनातील शहराचा व जिल्ह्याच्या विकासाच्या संकल्पनांचे संकलन करण्यात आले आहे.
जन संवाद या अभियानाचा समारोप शनिवार (दि.२०)रोजी सायंकाळी सावेडीच्या माऊली सभागृहात होणार आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या शहर व जिल्हाच्या विकासाच्या बृहत् आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी यांनी दिली.
या कार्यक्रमात प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेला बरोबर घेवून सर्व नगरकरांना विकसित भारत व विकसित अहिल्यानगर यासाठी शपथ सुद्धा दिली जाणार आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व डॉ.सुजय विखे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विचार भारतीचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, सहसचिव महेंद्र जाखेटे, अंकुश गोळे व अशोकराव गायकवाड यांनी केले आहे.