नवी दिल्ली – भारत जपानला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता बनला आहे. भारतातील एकूण वायू प्रदूषणात रस्त्यावरील वाहतूक क्षेत्राचा वाटा 40 टक्के आहे. ही समस्या कमी करण्यासाठी हिरवे इंधन पर्याय विकसित करण्याची आवश्यकता आहे. पर्यायी हरित इंधन विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरींनी यांनी केले आहे.
ग्रीन हायड्रोजनसारख्या हरित इंधनाचा विकास करण्याची गरज आहेच. पण ग्रीन हायड्रोजनची किंमत सध्याच्या 300 रुपये प्रति किलोवरून 83 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे गडकरी म्हणाले.
आयआयएससी बेंगळुरूने केलेल्या संशोधनाकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, जिथे संस्था बायोमास वापरून प्रति किलो 150 रुपये खर्च साध्य करू शकली आहे. नवी दिल्ली वायू प्रदूषणाच्या संकटाशी झुंजत आहे. दुसरीकडे देशातील 40 टक्के वायू प्रदूषणासाठी आम्ही (वाहतूक) जबाबदार आहोत.
त्यामुळे संपूर्ण भारतात पर्यायी इंधन विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. हे पाहता उद्योगांनी पर्यायी हरित इंधन पर्याय विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. तीन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांच्या उद्योगासह भारताला जगातील सर्वात मोठा वाहन निर्माता बनवण्याचे ध्येय आहे.