मुंबई – लोकांच्या डोक्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे भ्रम निर्माण झाला होता. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेली ती आता वाचणार आहे. एसटी टिकवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी टिकेल तर आपण टिकू. असे मत राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे मांडले आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न अजूनही सुटला नसून, त्यातच न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना हटविण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत एसटी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.