नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात अलिकडच्या काळात झालेल्या हिंदू विरोधी घटनांचा भारत सरकारच्यावतीने निषेध करण्यात आला असून भारत विरोधी कारवाया ऑस्ट्रेलियात होण्याला अटकाव करण्याचे आवाहन ऑस्ट्रेलिया सरकारला करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
भारतीयांच्या सुरक्षेला बाधो पोहोचेल अशा कोणत्याही कारवाया ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरून होऊ देऊ नयेत असे आवाहन त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारला केले आहे.
गेल्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना झाल्या आहेत. मंदिरांच्या बिंतींवर भारत आणि हिंदू विरोधी ग्राफिटी रंगवण्यात आल्या होत्या.
China/Taiwan : चेक प्रजासत्ताकच्या ‘त्या’ निर्णयाने चीनचा थयथयाट
काही ठिकाणी खलिस्तान समर्थनाच्या घोषणा रंगवण्यात आल्या होत्या. स्वामिनारायण मंदिरातील सामानाची तोडफोड देखील झाली होती. या सर्व घटनांच्या अनुषंगाने बागची यांनी ऑस्ट्रेलिया सरकारला भारतीयांच्या संरक्षणासाठी आवाहन केले आहे.