नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये भीषण अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बसमधील आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 19 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात 25 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.
दरम्यान मृतांची संख्या वाढू शकते अशी देखील माहिती आहे. माहितीनुसार या अपघातातील मृत आणि जखमी झालेले लोक हे मजूर होते. ते पंजाबहून बिहारला चालले होते. बस खराब झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
यामुळे काही प्रवाशी खाली उतरुन बस सुरु होण्याची वाट पाहात होते तर काही जण बसमध्येच होते. अचानक वेगाने येत असलेल्या ट्रक बसला धडक दिली.