पुणे : विराट कोहलीने शनिवारी भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होऊन संघासाठी एका नव्या युगाची सुरुवात करण्यास वाट मोकळी करुन दिली. दक्षिण आफ्रिकेतील संघाच्या अनपेक्षित मालिका पराभवाच्या पार्श्वभूमीवर विराटने कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
2014 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान माजी कर्णधार एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने पेचाच्या परिस्थितीत विराटने कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अशा कठिण परिस्थितीतून वाट काढत विराट भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. विराटने सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा भारतीय कर्णधार म्हणून नाव मिळवले.
कोहलीच्या कारकिर्दीत भारताने काही खरोखरच अविस्मरणीय क्षण पाहिले त्यामध्ये 2018/19 साली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजय आणि 2021 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 अशी अभेद्य आघाडीचा समावेश आहे.
असे असले तरी विराटला त्याच्या कर्णधार पदाच्या काळात आणखी यश मिळवण्याची संधी होती. मात्र, ती हुकली. या लेखातून विटराटच्या नेतृत्त्वात भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये अपूर्ण राहिलेल्या तीन कामगिरींवर प्रकाश टाकणार आहोेत.
1) न्यूझीलंडमधील मालिका विजय : न्यूझीलंडमध्ये फक्त दोन वेळा कसोटी मालिका विजयाची चव चाखल्येल्या भारतीय संघासाठी 2019-20 मधील कसोटी मालिका अंत्यंत निराशाजनक ठरली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला. विशे। म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा पहिला आणि एकमेव व्हाईटवॉश होता.
विराटच्या नेतृत्तावाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये एकमेव कसोटी मालिका खेळली त्यामध्ये भारताचा अत्यंत वाईट पराभव झाला. विराटच्या नेतृत्तावत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय इंग्लंडमध्ये 2-1 अशी आघाडी आणि कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान अशी जबरदस्त कामगिरी करणार्या भारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका विजयाचे स्वप्न अपुरेच राहिले.
2) दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका विजय : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील विजय विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश ठरले असते. कारण भारतीय संघाला अजूनपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौर्यात भारताला पहिला कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती. कारण इंग्लंडमधील मालिकेत 2-1 ने आघाडी घेतल्याने आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर चांगले प्रदर्शन केल्यामुळे, भारत कागदावर मजबूत दिसत होता.
पहिल्या कसोटीत केएल राहुलचे शतक आणि मोहम्मद शमीच्या पाच बळींनी भारताला सेंच्युरियन येथे ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र दुसर्या साम्यात मोहम्मद सिराजच्या दुखापतीमुळे भारताची गोलंदाजी कमकुवत झाल्यामुळे कर्णधार डीन एल्गरने यजमानांना विशेषत: बॅटने झुंज देण्याची प्रेरणा दिली. दोन्ही डावात भारताची फलंदाजी फसली आणि शार्दुल ठाकूरच्या सनसनाटी सात बळींनंतरही दक्षिण आफ्रिकेने सामना आरामात जिंकला.
या दौर्यातील तिसरा कसोटी सामना कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा ठरला, त्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला विराटच्या 79 धावांमुळे भारताला अवघ्या 223 धावा जमवता आल्या. दुसर्या डावात ऋषभ पंतच्या धाडसी तरीही सुरेख शतकामुळे भारताची भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य उभे केले होते.
नवख्या कीगन पीटरसनने 82 धावांची खेळी करत भारताच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि पुन्हा एकदा भारताचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका वियाचे स्वप्न, स्पप्नचं राहिले.
3) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद : आयसीसीने 2019-2021 मध्ये पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. 2019 ते 2021 या वर्षांत भारतीय संघाने सर्वत्र उल्लेखनीय कामगिरी करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साउथॅम्प्टन येथे खेळला जाणार होता. या अंतिम सामन्यात भारतासमोह न्यूझीलंडचे आव्हान होते. न्यूझीलंडने परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांती मालिका खेळच भारतापेक्षा चांगली तयारी केली.
या मालिकेतील 2-0 अशा विजयासह न्यूझीलंड अंतिम सामन्यातसाठी मैदानात उतरला. न्यूझीलंडने आपली लय राखत या सामन्यात दमदार कामगिरी करुन भारताला सहजपणे पराभूत केले. यामुळे भारताचे पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेवर मोहर उमटवण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले.