मुंबई: येत्या ५ ऑगस्ट’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे कमी लोकांच्या संख्येत हा कार्यक्रम होणार आहे. अयोध्या आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यावर अयोध्येला गेले होते.
५ ऑगस्ट’ला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
संजय राऊत म्हणाले,“अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे अयोध्या आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यावर अयोध्येला गेले होते. ५ ऑगस्ट’ला अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“देशाच्या, हिंदुत्त्वाच्या दृष्टीने भूमिपूजनाचा हा सोहळा ऐतिहासिक आहे. करोनाच संकट नसतं तर लाखो रामभक्त तिथे आले असते. पण करोनामुळे निमंत्रण देण्यावर बंधनं असून मला मिळालेल्या माहितीप्रमाण १५० लोकांना बोलावण्यात येणार आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.