Uddhav Thackeray । राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच स्पर्धा होत असल्याचे दिसतंय. त्यातच भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश नाही. त्यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीका केली होती. खासकरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावावरून निशाणा साधला होता. त्यात आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय.
तुमच्या हातात मोदींचं नशीब Uddhav Thackeray ।
उद्धव ठाकरे हे यवतमाळ दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “आगामी लोकसभा निवडणूक आमचेच सरकार येणार आहे. त्या सरकारमध्ये आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आताच्या सरकारमध्ये तुम्हाला केवळ मंत्रिपदाची खूर्ची दिली गेली होती. तर आमच्या सरकारमध्ये तुम्हाला अधिकारासह मंत्रिपदाची खूर्ची देतो. पण तुम्ही महाराष्ट्राचे पाणी काय असतं ते दाखवून द्या. मोदींसमोर झुकण्याची गरज नाही. तुमचं नशीब मोदींच्या हातात नसून तुमच्या हातात मोदींचं नशीब आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
संजय राठोड, भावना गवळींना केलं लक्ष्य Uddhav Thackeray ।
पुढे उद्धव ठाकरे यांनी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांचाही समाचार घेतला. इथल्या खासदारावर भाजपाने भ्रष्टाचाराने आरोप केले होते. मग त्यानंतर विकासासाठी खासदार महिला भाजपामध्ये गेल्या . त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राखी बांधली. भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी मोदी गॅरंटी दिली गेली, असे म्हणत खोचक टीका त्यांनी केली.
पुढे भाजपामध्ये पाच-पंचवीस कोटींच्या भ्रष्टाचाऱ्यांना किंमत नाही. तिथे ७० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं जातं, असे म्हणत अजित पवारांवर टीका केली. भाजपानेच अजित पवार यांच्यावर ७० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. चार दिवसांत अजित पवार उडी मारून भाजपाबरोबर गेले आणि त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. विचार करा ७० हजार कोटींचा घोटाळा केलेला माणूस उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्र्यांची किंमत काय असेल? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.