नागपूर – ज्यांचे राम मंदिर आंदोलनात कसलेही योगदान नाही, अशाप्रकारचे लोक असे आरोप करुन स्वत:चे हसू करुन घेत आहेत. तसेच, कोट्यवधी हिंदुंचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठा सेनेने अशाप्रकारे हिंदुचा अपमान करणे बंद करावे, असे प्रत्त्युतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना दिले आहे.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला उबाठा असे म्हणू नका, असे म्हटले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणा, मी उभा ठाकलेला आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत उबाठा म्हणत त्यांना डिवचंल होते. आता, फडणवीसांनी उबाठा सेना म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले आहे.