दुबई – आशिया करंडक 19 वर्षांखालील युवा क्रिकेट स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. साखळी लढतीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.
आता या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली असून या दोन्ही संघांनी हे सामने जिंकले तर त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल व त्या परिस्थितीत याच दोन संघात पुन्हा एकदा लढत होण्याची शक्यता नाकारता येणार आहे.
अशा वेळी भारतीय संघाला साखळीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. अ गटात भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला असून भारतीय संघाने या स्पर्धेत 3 सामने खेळले आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे पाकिस्ताने तीन पैकी तीन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.