मंचर -संततधार सुरू असलेल्या पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) शनिवारी (दि. 29) दुपारी शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यातील दोन दरवाजातून सुमारे 2000 क्युसेकचा विसर्ग सायंकाळी पाच वाजता घोडनदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
डिंभे धरण आंबेगाव, शिरूर, जुन्नर, तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांना पाण्याचा फायदा होतो. गेल्यावर्षी हे धरण 2 ऑगस्टला भरले होते. यावेळी धरण भरण्यासाठी गतवर्षीपेक्षा 27 दिवस अधिक लागले आहेत.
सध्या धरण सांडव्यावरून 2000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू असून, धरण जलाशयात पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित तीन दरवाजांतूनही पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
हे धरण भरल्यामुळे वर्षभर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, शाखा अभियंता तानाजी चिखले, दत्ता कोकणे यांनी दिली