श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.
सैन्याने परिसरात शोध घेतला असता, अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.सैन्याने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले, त्यानंतर चकमक झाली,सोमवार सकाळपर्यंत ही चकमक सुरू होती. त्यात सकाळी तेथील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
हे दोघेही लष्कर ए तोयबाशी संबंधित होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांच्या बद्दलचा अन्य तपशील मिळवला जात आहे. त्यांच्या जवळील स्फोटके आणि अन्य सामग्री ताब्यात घेण्यात आली आहे.