नागपूर – अहमदनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून दोन दलित कुटुंबांवर मोठ्या जमावाने हल्ला केला असा आरोप राज्यातील एक मंत्री छगन भुजबळ यांनी केला असून त्यांनी या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हल्लेखोरांनी या दलित कुटुंबियांना मारहाण करून त्यांची घरे उद्धवस्त केली असे ते म्हणाले. येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देऊन आरोप केला की, पिंपरी निर्मळ गावात बुधवारी दोन दलित कुटुंबांवर 400 ते 500 लोकांच्या जमावाने हल्ला केला आणि त्यांची घरे फोडली.
या दोन्ही कुटुंबांनी ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध मतदान केल्याने त्यांच्यावर हा सूड उगवला गेला असे भुजबळ म्हणाले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी केवळ ७० जणांवर गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी या दोन दलित कुटुंबियांना खेैरलांजी आणि मणिपुर प्रमाणे तुमचे हाल करू अशी धमकीही दिली आहे असे ते म्हणाले.