नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला भेट देत आहेत. मात्र या भेटीत काही सकारात्मक होईल अशी कसलीही चिन्हे दृष्टिपथात नाहीत असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
अमेरिका महासत्ता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या भेटीला महत्त्व आहे. मात्र काही नवे करार वगैरे होतील असे वाटत नाही. फक्त जुने करार पुढे चालू ठेवले जातील. सुरक्षा, अनु उर्जा, अवकाश संशोधन या क्षेत्रात दोन्ही देश आगोदरच सहकार्य करीत आहेत. ते पुढे चालू ठेवण्याचे ठरवले जाईल. यात नवीन काहीच नाही असे शर्मा म्हणाले.
उलट अमेरिकेने भारताबरोबरच व्यापार कमी केला आहे. त्याचबरोबर भारताला विकसित देश ठरविण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. या दोन्ही बाबींमुळे भारताचे नुकसान झाले आहे. यावर अमेरिका काही लवचिक भूमिका घेण्याची शक्यता नाही. कारण अमेरिकेचे ट्रम्प यांनी या बाबत अगोदरच नकारात्मक वक्तव्य करून ठेवलेली आहेत. त्याचबरोबर ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते कधी काही बोलतील याची कल्पना करता येत नाही. काश्मीरमधील मध्यस्थी बाबत त्यांचे वक्तव्य बरेच गाजले होते.