मुंबई – मराठी अभिनेता जितेंद्र जोशी नेहमीच आपल्या मनातील संताप आनंद सोशल माध्यमातून व्यक्त करत असतो. सोशल माध्यमामध्ये नेहमीच त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट वायरल होत असतात तर काही युजर्स त्याच्या पोस्टला ट्रोल सुद्धा करीत असतात. याच संदर्भात जितेंद्र जोशीने एक मराठी मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत सांगितलं आहे.
अभिनेता जितेंद्र जोशीने स्पष्ट दिले आहे की,’सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातील अंतर कमी झाले आहे. असे असले तरी याचे अनेक दुष्परिणामसुद्धा नेटकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल केलं जातं. त्यांच्या एखाद्या फोटोवर, विधानावर किंवा मतांवर टीका केली जाते. या ट्रोलिंगचा त्रास नक्की होतो’ असं म्हणत यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होणार नसल्याचं अभिनेता जितेंद्र जोशीने स्पष्ट केलं.