Gaurav More । Maharashtrachi Hasyajatra । ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेता ‘गौरव मोरे’ला मोठी लोकप्रियता मिळाली. विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे तो खास करून ओळखला जातो. या कार्यक्रमामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात दिसत नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. गौरवने हास्यजत्रेला रामराम केला का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
परंतु यावर गौरवने उत्तर दिले आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे.
गौरवने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे….
‘आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…… रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत.. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.
View this post on Instagram
माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील !
असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे.!