नवी दिल्ली- करोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन शिक्षण क्षेत्रातील सुधारक सोनम वॅंगचूक यांनी केले आहे. या आवाहनाला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व्यापाराचे संघटनेने पाठिंबा दिला आहे.
जगाला करून व्हायरसमुळे त्रस्त केलं करूनही चीन लडाख येथे दादागिरी करीत आहे. चीनच्या या अरेरावीचा मुकाबला करण्यासाठी चिनी वस्तूवर बंदी घालण्याची गरज असल्याचे वांगचुक यांनी म्हटले होते. कॉम्प्युटर रेशन ने म्हटले आहे की चीनमधून येणाऱ्या 3000 वस्तू भारतात तयार केल्या जाऊ शकतात. चीनमधील वस्तूपेक्षा भारतीय वस्तूंचा दर्जा चांगला असतो कॉम्प्युटर रेशनचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आम्ही व्यापाऱ्यांना चिनी वस्तू न घेता भारतातील वस्तू उपलब्ध करण्याचे आवाहन केलेले आहे.
आपण इथून आत्मनिर्भर होणे हेच यावर उत्तर आहे. मात्र केवळ बहिष्कार टाकून उपयोग होणार नाही तर चिनी वस्तूला पर्यायी वस्तू भारतीय बाजारपेठेत तयार करण्याचे आव्हान भारतातील उत्पादकांना पेलावे लागणार आहे. त्यासाठी सरकारने ही मदत देऊ केली आहे. याचा वापर करून भारत आपल्या गरजा साठी वस्तू तयार करू शकतो हे दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.