नवी दिल्ली : सुरवातीपेक्षा अधिक वेगाने भारतातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत बाधितांची संख्या 140वर पोहोचली. महाराष्ट्र आणि केरळला याचा सर्वाधिक फटका बसला असून कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली हेही सर्तकतेच्या पातळविर आले आहेत.
भारतात या विषाणूंच्या बाधेमुळे तीन जणांना बाधा झाली असून त्यावर अद्याप औषध सापडले नाही. अमेरिकेत या विषाणूवरील लशीची मानवावर सोमवारी चाचणी घेण्यात आली.
राज्यस्तरीय स्थिती : आंध्र प्रदेश – एक, दिल्ली -आठ, कर्नाटक -11, महाराष्ट्र -39, हरियाणा – 15, ओडिशा – 1, पंजाब – 1, राजस्थान – 4, तामिळनाडू – 1, तेलंगणा – 5, जम्मू काश्मिर – 3, लडाख – 6, उत्तर प्रदेश – 15, उत्तराखंड – 1, केरळ – 26 अशी बाधीतांची संख्या आहे. आतापर्यंत विमानतळावर 13 लाख 19 हजार 363 प्रवाशांची तपासणी केली आहे.
जगभराता कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सुमारे साडेपाच हजार जणांना बाधा झाली आहे. तर एकूण बाधीतांची संख्या एक लाख 88 हजार इतकी झाली आहे. तर सुमारे सात हजार 500 जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीसह जगभरातील अनेक देशातील मंदीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ीदेशांत नोकर कपात सुरू झाली आहे.