नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थाच्या हृदयस्पर्शी पत्राला उत्तर दिल असून, सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आणि विद्यार्थी यांचे हे दोन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत. “ही खऱ्या राजकारण्याची गुणवत्ता आहे! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी उदारपणे इयत्ता 2 च्या विद्यार्थ्याच्या शोक पत्राला उत्तर देतात.” या आशयाचे कॅप्शन खुशबू सुंदर यांनी दिल आहे.
काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, निधनाची ही बातमी ऐकताच इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेला ‘आरुष श्रीवत्स’ अतिशय भावुक झाला होता. आणि आरुषने आपल्या मनातील ह्याच भावना पत्रातून व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पत्राला मोदींनी देखील आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
आरुष श्रीवत्स आपल्या पत्रात म्हणतो.. “तुमची प्रिय आई श्रीमती हिरा बेन यांचे वयाच्या शंभरीत निधन झाल्याचे टीव्हीवर पाहून मला खूप वाईट वाटले. कृपया माझ्या मनःपूर्वक संवेदना स्वीकाराव्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती.” दरम्यान, त्याच्या या पत्राला पंतप्रधान मोदींनी देखील उत्तर दिल असून, त्याच्या करुणेबद्दल आभार मानले आहेत.
This is the quality of a true Statesman! Hon’ble PM @narendramodi ji responds to the condolence letter of a class 2 student. These are life changing gestures that will steer the life of this young one in the right direction. pic.twitter.com/97P9fIrQLP
— KhushbuSundar (@khushsundar) February 15, 2023
या पत्राला उत्तर देताना पीएम मोदींनी लिहिले की, ‘माझ्या आईच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आईचे निधन ही आयुष्यातील अविस्मरणीय घटना असून त्याचे दु:ख शब्दांपलीकडे आहे. तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये माझा समावेश केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे”. असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
आई हिराबाच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मोदींची खास पोस्ट..!
हिराबाच्या 100व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ब्लॉगमध्ये माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘त्यांच्या आई हिराबेन यांचा जन्म पालनपूर, विसनगर, मेहसाणा, गुजरात येथे झाला होता. जे वडनगरपासून अगदी जवळ आहे. लहान वयातच तिने स्पॅनिश फ्लूच्या साथीने तिची आई गमावली. हिराबेनला त्यांच्या आईचा चेहराही आठवत नाही. त्यांचे संपूर्ण बालपण आईशिवाय गेले. परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन लिहिता वाचायलाही जमले नव्हते. त्यांचे बालपण गरिबीत गेले.
हिराबेन केवळ घरातील सर्व कामे स्वतःच करत नव्हत्या, तर आर्थिक उत्पन्नासाठी देखील काम करत होत्या. त्या काहींच्या घरी धुणीभांडी करायच्या आणि घरखर्च भागवण्यासाठी सूत कातण्यासाठी वेळ काढायच्या. हिराबेन यांनी त्यांच्या जीवनात अनेक दैनंदिन संकटांना तोंड दिले आणि यशस्वीपणे मात केली. असं ते यावेळी म्हणाले होते.