आयुष्यात प्रेमसंबध नेहेमी तरुण रहावे अशी सर्वांची इच्छा असते. मात्र वादामुळे प्रेमसंबधात दुरावा निर्माण होतो. नात्याच्या सुरुवातीची एक्साइटमेंट वेळेनुसार कमी होत जाते.
धावपळीच्या जीवनात आपण जोडीदाराला महत्त्व देणे आपण विसरुन जातो. नात्यात होणारी भांडणे कमी झाली तर नात्यांना तुटण्यापासून वाचवता येते. सकाळी उठल्यावर जोडीदारा बरोबर काही वेळ गप्पा मारत बसावे.
सकाळचा चहा घेत संवाद साधल्यास संपूर्ण दिवस आनंदात जातो. सकाळीच भांड्यांची आदळआपट, बडबड, टोमणे सुरू केले तर दिवस कसा जाणार? याचा विचार करा.
नात्यातील संबंध अधिक घट्ट होण्यासाठी जोडीदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याची कला अवगत असावी.
लांब केस असलेल्या महिला नेहेमीच पुरुषांना आकर्षित करतात. सुगंध हा सर्वांना नेहमीच आकर्षित करतो. त्यामुळे साथीदाराला जवळ आणण्यासाठी परफ्युम्सचा सुगंध मुख्य भूमिका पार पाडतो. जोडीदाराची नजर तुमच्यावर खिळवून ठेवण्यासाठी महिलांनी जोडीदाराला आवडणारे कपडे घालावे. त्याच्या आवडीचे कपडे घालावेत.
बाहेर फिरण्यासाठी गेल्यावर जोडीदाराने सुचवलेले कपडे घाला. जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेण्याने जोडप्यांमध्ये प्रेमसंबध वाढवतात. जोडीदाराला सरप्राइज गिफ्ट द्या. जोडीदाराला न आवडणाऱ्या गोष्टी टाळा. एक बडबड करत असेल, भांडत असेल तर दुसऱ्याने शांत राहा. त्यामुळे समोरच्याचा राग आपोआप शांत होईल. यामुळे तुमच्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही.