मुंबई – बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमार त्याच्या चित्रपट आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. फिटनेस फ्रीक अक्षय कुमार चाहत्यांचे मनोरंजन करतो आणि त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करतो. मात्र सध्या अक्षय राजकारणात येण्यासाठी चर्चेत आहे. खिलाडी कुमार आता राजकारणाचा भाग बनणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा खुलासा खुद्द अक्षयने केला आहे.
View this post on Instagram
राजकारणात येण्यावर अक्षय काय म्हणाला?
राजकारणात येण्यासाठी अक्षय कुमारचे नाव याआधीही चर्चेत होते आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरं तर, अलीकडेच पॉल मॉल, लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित “”Hindujas and Bollywood” च्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, अभिनेत्याला राजकारणात येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर खिलाडी कुमारने प्रत्युत्तर दिले की,’मी सिनेमातूनच समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो.’
View this post on Instagram
राजकारण येण्याबाबत अक्षय पुढे म्हणाला,’चित्रपट बनवताना मला खूप आनंद होत आहे. एक अभिनेता म्हणून मी चित्रपटांमध्ये सामाजिक प्रश्न मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. मी 150 चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे ते म्हणजे रक्षाबंधन.’
View this post on Instagram
अक्षय कुमार पुढे म्हणाला,’मी व्यावसायिक चित्रपट तयार करतो, काहीवेळा असे, जे सामाजिक समस्यांशी संबंधित असतात.’ अक्षयने पुढे सांगितले की तो एका वर्षात सुमारे 3-4 चित्रपटांची निर्मिती करतो.
अक्षयचा रक्षाबंधन चित्रपट या दिवशी रिलीज होणार
अक्षय कुमारबद्दल सांगायचे तर, त्याने सौदागर या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून अक्षयचे स्टारडम कायम आहे. अक्षय लवकरच रक्षाबंधन या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. आता बघूया अक्षयच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत राहली होती. त्यावेळी सुद्धा अक्षय लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.