पौंड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.
सध्या करोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार कमी होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मुळशीत लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पळसे धबधबा, पिंपरी दरी पॉईंट, सहारा मिटी, कोळवन परिसर, ताम्हिणी घाट परिसर पर्यटनास बंदी केली असून ही पुण्यातून मुळशीला फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
पुण्याहून येणाऱ्या नागरिकांना पौड पोलिसांनी मूठ खिंड, करमोळी- रावडे फाटा, शासकीय गोडाऊन पौड जवळ नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी दरम्यान नागरिकांची चौकशी करून योग्य ती विचारणा करूनच पोलीस मुळशीतील स्थानिक नागरिकांची ओळखपत्र पाहून त्यांना जाणे येण्यास परवानगी देत आहे.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे, राजेंद्र शितोळे पोलिस हवालदार संदीप सकपाळ, पंढरीनाथ कामथे, पोलिस नाईक आनंदा बाठे, चंद्रशेखर हगवणे, पोलिस शिपाई तुषार भोईटे, अक्षय नलावडे, साहिल शेख,राजेंद्र गायकवाड, होमगार्ड मरकड, शेडगे, वीर हे पर्यटकांना पुन्हा घरचा रस्ता दाखवत आहे.