विश्रांतवाडी : सर्व जाती धर्मांना एकत्रित करण्याचे काम बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा वारसा पुढे बसवेश्वरांनी चालवला. महापुरुषांची जयंती म्हणजे त्यांचे विचार आत्मसात करणे होय. महापुरुषांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असतात. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत बसवकथाकार ऍड शिवानंद हैबतपुरे यांनी व्यक्त केले.
धानोरी येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने जगतगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हैबतपुरे बोलत होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन, बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बसवकथाकार ऍड शिवानंद हैबतपुरे, लिंगायत संघर्ष समितीचे भगवानशेट कोठावळे, लिंगायत सेवा मंडळाचे सचिव अनिल शिवमुर्ती रूद्रके, नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, नगरसेविका रेखा टिंगरे, बंदे खुदा ट्रस्टचे आझम शेख, राष्ट्रीय बसव दलाचे पुणे शहराध्यक्ष सतिश पाटील, नरसिंग मुळे, वीरशैव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संतोष यादवाडे, बसवसेवा प्रतिष्ठाणचे संतोष मलशेट्टे, बांधकाम व्यावसायिक प्रभाकर भोसले, सुधाकर शेटे, ज्ञानेश्वर बनसोडे, आप्पासाहेब मनकाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र पठारे, मोहनराव शिंदे, विनोद पवार, चंद्रकांत टिंगरे, नवनाथ मोझे, शशिकांत टिंगरे, धनंजय जाधव, मिलिंद खांदवे, डॉ. राजेश साठे, शांताराम खलसे व पुणे शहरातील विविध भागात कार्यरत असणारे लिंगायत चळवळीतील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, कळस, विश्रांतवाडी परिसरातील लिंगायत समाजबांधवांसह प्रतिष्ठाणच्या हितचिंतकांनी हिरीरीने सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला.
दिघीतील मातृछाया अनाथालयातील मुलांना खाऊ व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच भैरवनगर, आनंदपार्क परिसरात घरोघरी जाऊन ओला व सुका वर्गीकरण केलेला कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छतादूत महिला कर्मचारी व पाणी सोडणारे वॉलमन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विधायक उपक्रमांद्वारे समाजसेवा करणाऱ्या ग्रीन अवनी फाऊंडेशन(लोहगाव), वृक्ष सेवा समिती(धानोरी), बंदे खुदा ट्रस्ट(पुणे), वीरशैव सेवा मंडळ(वडगावशेरी), वीरशैव लिंगायत युवक मंडळ(केशवनगर),संकल्पनगरी मित्र मंडळ(धानोरी), माता जिजाऊ प्रतिष्ठाण(धानोरी) आदी संस्था त्याचबरोबर आदर्श समाज घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व बसव विचारांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ ढोले यांनी केले. सुनील समाने यांनी सूत्रसंचालन व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गुरुनाथ(आण्णा) बिराजदार यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, नरेंद्र बिडवे, महेश घडमोडे, संदीप हत्तुरे, योगेश जोगदंड, योगेश धसाडे, महेश सगरे, श्रीकांत बिराजदार, ओंकार बिराजदार,सुशील देटे, सुमित सूर्यवंशी, प्रमोद कदम, सिद्धार्थ तरकसे, आशिष येडुर, व्यंकटेश आगलावे, संजय कोकिलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.