नगर, (प्रतिनिधी) – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी देशातील वंचित, उपेक्षित अशा शेवटच्या घटकासाठी काम करत त्यांना प्रवाहात आणले. त्यांचे अंत्योदयचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. जनसंघाच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचार व शिकवणी वरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत देशातील शेवटच्या स्तरापर्यंत विकासाची किरणे पोहचवले आहेत.
दीनदयाळ पतसंस्थेची वाटचालही उपाध्यांच्या विचारांवरच चालू आहे. शहरातील सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार व कार्य आत्मसात करून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्था व शहर भाजपच्या वतीने स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृति दिनानिमित्त पतसंस्थेतील त्यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ विधीज्ञ अच्युत पिंगळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यत आले.
या वेळी ते बोलत होते. या वेळी मानद सचिव विकास पाथरकर, संचालक निलेश लोढा, बाबासाहेब साठे, भाजपचे ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, सचिन पारखी, राहुल जामगावकर, अनिल गट्टानी, अनिल जोशी, तुषार पोटे, बाळासाहेब भुजबळ, धनंजय जाधव, राजेंद्र काळे, बाळासाहेब गायकवाड, अनंत देसाई, प्रशांत मुथा, मयूर बोचूघोळ, सुहास पाथरकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, युवक, महिला उपस्थित होते.
प्रास्ताविकात विकास पाथरकर म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा घेत शहरात दीनदयाळ पतसंस्थेची स्थापना केली आहे. स्व.उपाध्याय यांनी जसे शेवटच्या घटकासाठी काम केले तसे आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामन्यांना अर्थ सहाय्य करत स्वतःच्या पायावर उभे करत आहोत. या वेळी कालिंदी केसकर, प्रिया जानवे, श्वेता पंधाडे, बसंत सिंग, अनिल निकम, गोपाल वर्मा, लक्ष्मिकांत तिवारी, राहुल रासकर, पिंटू ढोणे, सागर शिंदे, महेश नामदे, बंटी डापसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.