मुंबई : मनसेच्या बदलेल्या ध्वजावर जलसम्पदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटवरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये मंत्री म्हणाले कि, मनसेच्या बदलेल्या झेंड्यापेक्षा विचार महत्वाचे ठरणार आहेत. मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना होणार असल्याची माहिती स्वागतार्ह आहे.
अभ्यासपूर्ण विरोध होत असेल तर विचारांचे स्वागतच आहे. विरोधी पक्ष आंधळा नसावा. राज्याच्या प्रगतीसाठी काही गोष्टींना विरोध होत असेल तर ते चांगलेच आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी मनसेच्या शिवमुद्रा नव्या ध्वजाचे अनावरण केले आहे.