नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर देशभरातील विविध पक्षांकडून अर्थतज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही वर्गासाठी काहीही नसल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
M0di G0vernment’s Zer0 Sum Budget!
Nothing for
– Salaried class
– Middle class
– The poor & deprived
– Youth
– Farmers
– MSMEs— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2022
राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण ऐकले आणि भाषण संपल्यानंतर ते संसदेबाहेर आले. यादरम्यान त्यांनी मीडियाला कुठलाही संवाद साधला नाही. मात्र, काही वेळातच राहुल गांधी यांनी ट्विट करुन 2022 च्या अर्थसंकल्पाबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि या बजेटला मोदी सरकारचे शून्य बजेट म्हटले.”पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय गरीब, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी या अर्थसंकल्पात काहीही मिळाले नाही”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
याआधीही राहुल गांधी यांनी आर्थिक सर्व्हेबाबत म्हटले होते की, देशातील जनता कर वसुलीच्या बोजामुळे त्रस्त आहे. तर मोदी सरकारसाठी ही कराची कमाई मोठी उपलब्धी आहे. दृष्टिकोनाचा फरक आहे – त्यांना फक्त त्यांची संपत्ती दिसते, लोकांचे दुःख नाही.