नवी दिल्ली – शाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान गतीशक्ती योजना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 25 हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा केली आहे. वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
मेट्रोचे जाळे
मेट्रो ट्रेनचे जाळे उभे करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करणार आहेत.
डोंगराळ भागातही पर्वतमाला’ करणार रस्त्यांचा विस्तार!
पर्वतमाला’ या योजनेंतर्गत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. हे उपक्रम खासगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या तत्वावर राबवले जाणार आहेत.
112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार असून 112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यातील तालुक्यांच्या विकासासाठी, गावांना रस्त्यानं जोडण्यासाठी विलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यात आली आहे. यासाठी सध्याच्या योजनांचं एकत्रीकरण केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.