मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे “भ्रमित ठाकरे” सरकार असल्याची टीका त्यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही टीका केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक ? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे.
काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक ?
अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे.— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 1, 2020