मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचे ट्विट केले आहे. “भाजप सोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही ” अफवांवर विश्वास ठेऊ नका असे ट्विट आज एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
काय आहे ट्विट ?
“भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.” अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की ,’वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस ‘. असे त्यांनी म्हंटले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे. ती म्हणजे शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन करणार. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर नव्या मंत्रिमंडळात कोणकोणते नेते असतील कोणाला कोणती मंत्रीपदे मिळतील याबाबत देखील तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.” असे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.