मुंबई – आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत येणारे अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल आणि त्या वेळेसच्या साम्राज्याबाबत एक विधान केलं आहे. ज्यामुळे आता नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. मुघल जर एवढे क्रूर आणि विध्वंसक होते तर त्यांनी बनवलेला ताज महाल आणि लाल किल्ला पडून टाका असं धक्कादायक विधान अभिनेते शहा यांनी केले आहे. एका इंग्रजी मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखततीत नसिरुद्दीन शहा यांनी हे विधान केलं आहे.
‘ताज’ या आगामी वेब सिरीजमध्ये नसीरुद्दीन शहा मुघल सम्राट अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोक सम्राट अकबर आणि तैमूर शहामधील फरक सांगत नाहीत याच मला आश्चर्य वाटत असं नसीरुद्दीन शहा यावेळी म्हणाले.
तैमूर लुटमार करायला येथे आला होता.तर मुघल येथे लुटमार करायला आले नव्हते. या भूमीवर स्थायिक होण्यासाठी ते आले होते. त्यांच्या योगदानाला कोण नाकारू शकतो? असा सवाल देखील नसीरुद्दीन शहा यांनी यावेळी उपस्थित केला. मुघलांनी त्यांच्या परंपरांना ग्लोरिफाय केलं होत हे सत्यही असेल पण म्हणून त्यांना आपण व्हिलन करू शकत नाही त्यांनी जे काही केलं ते भयानक असेल तर ताजमहाल पाडून टाका,लाल किल्ला आणि कुटूंब मिनार देखील पाडून टाका असे शहा यावेळी म्हणाले. मुघलांचा उदो उदो करण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांना व्हिलन तर बनवू नका असं देखील नसीरुद्दिन शहा यावेळी म्हणाले.
ताज सिरीजबाबत
ताज डिव्हायडेड बाय ब्लडचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नसीरुद्दीन शाह अकबरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचबरोबर आशिम गुलाटी सलीमच्या भूमिकेत तर आदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत आहे.प्रेम कथेसह वारसा हक्काची कहाणी सांगणारी ही सिरीज खूपच रंजक वाटत आहे.विशेष म्हणजे यात बऱ्याच दिवसांनी अभिनेते धर्मेंद्र यांचीही झलक पाहायला मिळणार आहे.