नवी दिल्ली – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असलेले यशवंत सिन्हा कधीकाळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या राजकारणात पुढे आणले पाहिजे, असे विधान त्यांनी 2014 मध्ये केले होते व तेव्हा मोदींनी त्यांना फोन करून त्यांचे आभारही मानले होते. मात्र त्यानंतर सिन्हा सातत्याने मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात बोलत असतात. असे का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले आहे. आपण मोदी यांचा द्वेष करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले की, मोदींचा तिरस्कार नाही. मात्र काही बाबतीत मतभेद असतात. तसे त्यांच्याबाबतीत आहेत ते आहेत. मी कोणाचा व्यक्तीगत आधारावर द्वेष करत नाही. त्यांच्या नितीच्या आधारावर विरोध करतो. मी वेगळ्या प्रकारे विचार करतो आणि मोदी हे वेगळ्या प्रकारे विचार करतात. मोदींना पुढे आणले पाहिजे हे आपण तेव्हा म्हटले होते कारण तेव्हा देशाच्या मनात काय चालले आहे ते मला समजत होते.
त्यानुसार मी आपले मत मांडले. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आर्थिक बाबतीत मला जाणवले की देश चुकीच्या मार्गाने चालला आहे. नोटाबंदीच्या अगोदर देशाचा विकास दर आठ टक्क्यांच्या वर होता. तो आता चार टक्क्यांवर आला आहे. करोना काळात तर तो मायनसमध्ये गेला होता.
खेळात राजकीय हस्तक्षेप नको – शरद पवार
मोदी यांना 2002 मध्येच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवायला पाहिजे होते का, असे विचारल्यावर सिन्हा म्हणाले की मोदींना तेव्हा पदावर कायम ठेवून भारतीय जनता पार्टीने मोठी चूक केली या मताशी सहमत आहे. तेव्हा मोदींना हटवण्याची अटल बिहारी वाजपेयी यांची इच्छा होती. मात्र लालकृष्ण आडवाणी यांचा त्याला विरोध होता. अटलजी जनभावनेनुसार निर्णय घेणारे होते. तेव्हा जनभावना मोदींना हटवण्याच्या विरोधात आहे असे त्यांना जाणवले व त्यांनी मोदींना कायम ठेवले.
1996 च्या ‘त्या’ प्रकरणात राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा