ओतूर – जुन्नर तालुक्यातील कोपरे गावात भीषण पाणीटंचाई आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली ही समस्या मिटविण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळऱाव यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि कोपर्यासह मुथाळणे येथे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून त्यांची तहान भागविण्याचे काम सुरु केल्याचे चित्र दिसून आले आहे.
या भागात ऐन उन्हाळ्यात खडकातले झरे देखील आटले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी वणवण भटकून सुद्धा पाणी मिळत नसताना, आता टँकर येऊ लागल्याने कोपर्याच्या ग्रामस्थांनी निश्वास सोडल्याची भावना या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि सीतेवाडीचे सरपंच विकास राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान कोपरे गावात सध्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या चार फेर्या केल्या जात आहेत. कोपरे गावात दोन, तर मुथाळणे गावात दोन अशा मिळून चार टँकर करण्यात आले आहेत.
कोपरे गावात वर्षानुवर्षे भीषण पाणीटंचाई जाणवत असताना राजकीय व्यक्तींनी लक्ष देणे अपेक्षित असताना इकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप घोडेगावच्या आदीवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पस्तरीय माजी सदस्य दत्ता गवारी यांनी केला आहे.