नवी दिल्ली : वऱ्हाडी मंडळींचे स्वागत झाले…नवरा-नवरीकडील मंडळी आता मंगलाष्टके आणि सप्तपदीचीच वाट पाहत होते….नवरा नवरीची वाट पाहत होता पण नवरी काही केल्या येईना…तेंव्हा कळलं नवरी आपल्या प्रियकरासोबत भरमंडपातून पळून गेली…हा सर्व प्रकार तुम्हाला चित्रपटासारखा वाटत असला तरी हे प्रत्यक्षात घडले आहे. त्यानंतर जे काही घडले हे सगळं थक्क करणारं होतं…
हा सर्व प्रकार घडला आहे राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील बाली उपविभागात. सकाराम यांची मुलगी मनीषा हिचा विवाह येथील सायना गावात पार पडणार होता. मात्र तिचे सिरोही जिल्ह्यातील मनादर गावातील रहिवासी श्रवण कुमार याच्याशी लग्न ठरले होते. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार वऱ्हाडी श्रावण वऱ्हाडी मंडळीसह ३ मे रोजी सेगा गावात पोहोचले. जिथे वधू पक्षाने वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करत खूप चांगला पाहुणचार दिला. सर्व काही ठीक चालले होते. पण 4 मे रोजी, सकाळी 6.15 वाजता सप्तपदीच्या आधी, पंडितजींनी वधूला मंडपात बोलावण्यास सांगितले. त्यावर, नवरीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले.
दुसरीकडे नवरी असणारी मनीषा पोटात दुखत असून उलट्या होत असल्याचे सांगत घरामागील टाकीजवळ पोहोचली.जिथून तिने तिच्या प्रियकरासोबत पलायन केले. आता इकडे बराच वेळ होऊनही मनिषा परत न आल्याने तिच्या काकूने जाऊन तिला पाहिले. मुलगी आजूबाजूला न दिसल्याने नातेवाइकांसह कुटुंबियांनाही धक्का बसला.
हे सगळं सुरु असताना दुसरीकडे नवरदेव असणाऱ्या श्रवण कुमारने त्याच्या घरच्यांना आपण मुलीला आपली पत्नी बनवणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यानंतर नवरीचा शोध सुरु झाला..एक नाही दोन नाही तर तब्बल 13 दिवसांनी नवरीचा आणि तिच्या प्रियकराचा शोध लागला. नवरीची वाट पाहत असताना नवरदेवाने मंडपात १३ दिवस तळ ठोकला एवढंच नाही तर आपली पगडीही काढली नाही. अखेर 15 मे रोजी नवरीला गुजरातमधून आणण्यात आले. त्यानंतर 16 मे रोजी नवरीची वाट पाहणाऱ्या नावरदेवासोबत बिदाई करण्यात आली.
नवरीचे वडील सकाराम यांनी, त्यांची मुलगी मनीषा सप्तपदीपूर्वी पळून गेली होती. ज्याच्या सोबत गेली तो आरोपी भरतकुमार हा त्याच्या मामाचा मुलगा शिवलालचा मुलगा असून तो भातुंडचा रहिवासी आहे.असे म्हटले आहे. दरम्यान, या आगळ्या वेगळ्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.