पुणे – करोनामध्ये आर्थिक परिस्थिती खालवल्याने एका उच्चभ्रू कुटूंबाने दर अमावस्येला अघोरी पुजा करण्याचा घाट घातला. या अघोरी पुजेसाठी सुनेला जबरदस्ती बसवून तीला मृत प्रेताची राख पिण्यास भाग पाडले . एकदा तीने राख पिण्यास नकार दिल्याने पिला पिस्तूलाचा धाकही दाखवण्यात आला. तसेच तीला कोकणात नेऊन मध्यरात्री धबधब्याखाली आंघोळ करण्यास भाग पाडले. या अघोरी प्रकाराविरुध्द विवाहित महिलेने तक्रार दाखल केली आहे.
जयेश कृष्णा पोकळे, श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णु पोकळे, दिपक जाधव, स्नेहा जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी सासरच्या लोकांवर विवाहितेचा छळ आणि नरबळी व अमानुषअनिष्ट प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात मुल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खावू घातल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर, जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय, अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या 1/2 pic.twitter.com/72SyZ8mIre
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 19, 2023
या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने केली आहे. पुणे येथील या घटनेप्रकरणी दोषारोपपत्र सादर होणे गरजेचे आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
दरम्यान, विवाहितेने दिलेल्या तक्रारीनूसार, तीचा साखरपुडा 2019 मध्ये एका पंचतारांकीत हॉटेलात पार पडला, यानंतर तीचा विवाह झाला. दरम्यान करोनामुळे तीच्या सासरची आर्थिक परिस्थिती ढासळली. यामुळे सासरचे प्रत्येक अमावस्येला काळे कपडे घालून अघोरी पुजा करत होते. त्या पुजेमध्ये टाचणी लावलेली लिंबू, काळया बाहुल्या, मिरची, हळदी-कुंकू-बुक्का असे होते. त्यावेळी जाव कोणत्यातरी मांत्रिक महिलेला व्हॉट्सऍपचे माध्यमातून व्हिडीओ कॉल लावुन पूजा करत होती. पुजेला विवाहितेला बळजबरीने बसविले गेले
एका अमावस्येच्या दिर, जाऊ, पती व सासुसासरे यांन स्मशानभुमीमध्ये घेऊन जाऊन तेथे जळालेल्या मृत प्रेताची काही हाडे गोळा केली व राख मडक्यात घेतली. ते सगळं घरी आणुन त्याची पूजा केली. त्यानंतर ते हळदी-कुंकू व स्मशानामधुन आणलेली राख पाण्यामध्ये मिक्स करून विवाहितेला एकटीलाच पिण्यासाठी दिले.