नवी दिल्ली – ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार हे सुशासन आणि राहणीमान सुलभतेसाठी आमची वचनबद्धता दृढ करण्याचे आणखी एक माध्यम आहे. ड्रोनच्या रूपात, आम्हाला एक स्मार्ट साधन मिळाले आहे जे सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग बनणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारत ड्रोन महोत्सवरत बोलतांना ते म्हणाले की, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पर्यटन, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढणार आहे. प्रगती पुनरावलोकने आणि केदारनाथ प्रकल्पांच्या उदाहरणांद्वारे अधिकृत निर्णय घेताना ड्रोनचा वापर केला. ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि त्यांचे जीवन आधुनिक बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.
रस्ते, वीज, ऑप्टिकल फायबर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाची साक्ष गावोगावी दिसू लागली आहे. तरीही, शेतीचे काम जुनाट पद्धतीने केले जात आहे, यामुळे अडचणी, कमी उत्पादकतेसह नुकसान आहे. जमिनीच्या नोंदीपासून ते पूर आणि दुष्काळ निवारणापर्यंतच्या कामांबाबत महसूल विभागावर सतत अवलंबून राहावे लागते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ड्रोन हे प्रभावी साधन म्हणून उदयाला आले आहे, असे ते म्हणाले.
कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे, तंत्रज्ञान यापुढे शेतकऱ्यांसाठी भितीदायक राहणार नाही हे सुनिश्चित झाले आहे असेही पंतप्रधान म्हणाले. ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि त्यांचे जीवन आधुनिक बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान आणि त्याचे शोध हे उच्चभ्रू वर्गासाठी मानले जात होते याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. आपण आज प्रथम सर्वसामान्य जनतेला तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ड्रोनवर बरेच निर्बंध होते. आम्ही फार कमी वेळात बहुतांश निर्बंध हटवले आहेत.
उत्पादन सलग्न प्रोत्साहन सारख्या (पीएलआय) योजनांद्वारे आम्ही भारतात एक मजबूत ड्रोन उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहोत. तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याच्या वापराच्या शक्यताही त्याप्रमाणात वाढतात असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.