मुंबई – बॉलीवूड आणि वादंग नेहमीच बरोबर होत असतात. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने त्याच्या सत्यनारायण की कथा या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार होता.
मात्र आता त्याचे शीर्षक बदलले जाणार आहे. सिनेमाचा डायरेक्टर समीर विद्वांसने ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली. या सिनेमाचे नवीन शीर्षक बदलणे हे क्रिएटिव्ह प्रोसेसचा एक भाग आहे.
अगदी भिन्न जरी असले तरी या शीर्षकामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून या सिनेमाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सिनेमासाठी नवीन शीर्षक लवकरच निश्चित केले जाईल, असे डायरेक्टरने म्हटले आहे. सिनेमाचे निर्माते आणि क्रिएटिव्ह टीमलादेखील हे म्हणणे पटले आहे.
साजिद नाडियादवालाच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या कॉमेडी लव्ह स्टोरीमध्ये कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये असणार आहे.
स्पेशल लोकांसाठी स्पेशल फिल्म अशा शब्दांत कार्तिक आर्यनने या सिनेमाचे वर्णन केले होते. या सिनेमाशिवाय धमाका आणि भूलभूलय्या 2 मध्येही कार्तिक आर्यन असणार आहे.