मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कामकाजावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. तीन पक्षाचे सरकार…“खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत…असे म्हणत पुन्हा एकदा सरकारवर शेलारांनी हल्लाबोल केला आहे.
टाळेबंदी हा शब्दच हद्दपार करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असले तरी याच मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टाळेबंदीच्या मुदतवाढीबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप आहे. मुंबईत दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर न फिरण्याचा निर्णय घेताना गृहमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याबद्दलही राष्ट्रवादीमध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत..सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा..
या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण!
आमच्या ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे!!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 4, 2020
तीन पक्षाचं सरकार… “खाटांची” रोज कुरकुर…समजूत काढायला रोज धावपळ…एक बाजू झाकली की दुसरंच काहीतरी उघडं पडत..सगळाच तीन तिघाडा आणि काम बिघाडा.. या गदारोळात सरकारला विद्यार्थ्यांचा विसर पडू नये म्हणून हे स्मरण! आमच्या ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय अजून बाकी आहे!! असं शेलार यांनी ट्विट केले आहे.