पुणे: अलिबाग किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर या वादळाने आपला मार्ग बदलला आहे. त्यामुळे मुंबईला असणारा वादळाचा धोका टळला आहे. आता हे वादळ कर्जत, पनवेल, खोपोली मार्गे धुळे येथून पुढे जाणार आहे. असे हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसेच हवामान विभागाने दिलेला धोक्याचा इशारा कायम असून पुढील काही तास मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत.
अलिबाग येथे वादळ धडकल्यानंतर ते मुंबई आणि ठाणेच्या दिशेने सरकत होते पण नंतर अचानक वादळाने दिशा बदलून आता पनवेल,कर्जत खोपोलीच्या दिशेने जात आहे. तेथून ते पुढे धुळे नाशिक’ला धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे नाशिक प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. नाशिक’ला जरी वादळ धडकले तरी त्याची तिव्रता मात्र कमी होत जाणार आहे. मुंबईचा धोका टळला असला तरी सध्या मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर वादळी वारे सुद्धा वाहत आहेत.
#NisargaCyclone : मुंबई विमानतळावरील विमानसेवा सायंकाळी ७ पर्यंत रद्द