अलिबाग, मुंबई : अलिबाग जवळच्या किनारावर्ती भागात ताशी 100 किमी प्रतीतास वेगाने वाहणारे निसर्ग वादळ अलिबाग जवळ मिनीवर धडकले. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी होता. वादळ जमिनीवर येण्याची प्रक्रिया जवळपास तीन तास सुरु होती. त्यापुर्वी राज्याच्या बहुतांश किनारपट्टीला या वादळाने स्पर्श केला.
या वादळाच्या प्रमुख घटना
1) या वादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी 100-110 किमी होता.
2) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने वृक्ष उन्मळुन पडले.
3) राज्याच्या सातही किनारावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड ऍलर्ट जारी केला आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर मुसळधारवृष्टीची शक्यता
4) गोवा आणि दक्षिण कोकणात यापुर्वी 127 मिमि पावसाची नोंद
5) कोकणातून 60 हजार जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर.
6) 7003 बोट किनाऱ्यावर आणल्या
7) महाराष्ट्र गुजरातमधून एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले,
8) कोविड व्यतिरिक्त रुग्णालयांसह सर्व आपत्कालीन सेवांना सतर्कतेचा इशारा
9) देशातील 18 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा या वादळामुळे फटका
10) संपूर्ण दक्षिण भारतावर काळ्या ढगांची गर्दी असल्याचे नासाचे छायाचित्र
11) रत्नागिरी आणि हुबळ ज्जिल्ह्यालाही पावसाने झोडपले
12) एनडीआरएफच्या 43 टीम दोन राज्यात दाखल. त्यातील महाराष्ट्रअत 21 टीम